Saturday, January 29, 2011

ओर्कुट,फेसबुक - आभासी दुनिया


तरुण वयातील मुले मुली हि ओर्कुट,फेसबुक संकेतस्थळावर अक्षरशा पडीक असतात।यामागे नवीन गोष्टीचे आकर्षण,मनोरंजन अशा बाबी असल्या तरी त्याचा त्यांच्या मनावर आणि विचार करण्याच्या पद्धतीवर खोलवर परिणाम होत असतो.


या आभासी दुनियेत प्रत्येकजण आपली एक प्रतिमा तयार करायच्या मागे लागलेला असतो तो तसाच खरया जीवनात असेल असे सांगता येत नसले तरी काही कालावधी नंतर आपण त्या प्रतिमेप्रमाणेच आहोत असे त्याला वाटू लागते परंतु खरी परिस्थिती तशी नसते आणि ती समोर आली कि त्याला धक्का बसतो।
खरया आयुष्यात आपणाला जे काही बोलता येत नाही किंवा जसे वागता येत नाही परंतु तशी खूप इच्छा असते अशा गोष्टींची पूर्तता हि आभासी दुनिया करते।

आभासी जगात जगताना आपणाल जसे हवे आहे तसे जगता येते परंतु तसेच खऱ्या आयुष्यात जगता येत नाही आणि असे झाले कि मनाला खूप त्रास होतो आणि चीड चीड होते
त्यामुळे आपण जसे आहोत आपला स्वभाव जसा आहे तसा इथे मांडत राहावे त्यामुळे त्याचे काय परिणाम भावी आयुष्यात होऊ शकतात ते येथील चर्चेने आणि मैत्रीने समजू शकते

शेवटी कस जगायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे
फक्त एक आहे आपण इथे आभास निर्माण करून स्वताला फसवत असतो

या आभासी दुनयेचे व्यसन हो व्यसनच कधी लागते हे समजतच नाही आणि माणूस यात वाहून जातो वेळीच यावर उपाय नाही केला गेला तर आपल्या वैयक्तिक आयुष्याला यामुळे हानी पोहचू शकते.

Friday, January 14, 2011

अशीच एक सकाळ

एका स्त्री च्या दृष्टि कोनातून :


येतो असा एखादा क्षण जेव्हा तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजता, असं बऱ्याच वेळा होतं आपल्या बाबतीत।
सकाळ पासून मूड जरा खराबच असतो, सकाळचा पहीला चहाही नीट केल्या जात नाही, देवालाही कसाबसाच नमस्कार होतो। ऑफिस ला जायला पावलं घरातून बाहेर पडायला जड़ होतात. रस्त्याला लागल्यावरही आजुबाजुला फ़क्त बघ्यासारखं बघणं सुरु असतं. काम खुप असलं तरी करायची बिलकुल इच्छा होत नाही।
मग येतो एखादा ओळखी च्या व्यक्तीचा फोन आणि होतात गप्पा सुरु।

माझा आज मूड ठिक नाहीए गं.” नेहमीच्या स्वरात मी सुरु होते..
“का? काय झालं मूड ठीक नसायला?” तिकडचा आवाज म्हणतो..
मी सांगते मग माझी सगळी व्यथा. आज उठायला उशीर जाल्या पासून, रोजच्या कामापर्यंत मला आता कंटाळा आलाय इथपर्यंत.
आतापर्यंत शांत आणि आपलासा वाटणारा आवाज आता जरा बदलायला लागतो,। आणि सांगतो
“तुला नं पहिल्यापासूनच सवय आहे, सगळं चांगलं असतांना विनाकारण चिंता करायची। आपल्या आईला लग्नं झाल्यावर किती कामं करायला लागायची माहिती आहे नं तुला?” इथपासुन गावाकडच्या गृहिणींना रोजच किती मरावे लागते शेतात, वगैरे…मी आपली मान डोलावते।
त्यामानाने तुला तर काहीच त्रास नाही.” आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतॊ..
"अरे हो! खरंच आहे की. मी तर खुप मजेत आहे त्यामानाने."

कसं असतं नं ?

तुमच्या जवळ असलेल्या भाग्याची सतत कुणीतरी जाणीव करुन द्यायला लागते नाहीतर आपण असेच भरकटत राहतो…वाईट वाटुन घेत राहतो उगाचंच…

Thursday, January 13, 2011

जामनगर, गुजरात स्मशान भुमितिल पुतला

खली दिलेला फोटो सर्व कही बोलूं जातो माला जास्त कही सांगायची गरज नाही