Friday, September 30, 2011

लव्ह स्टोरी

लव्ह स्टोरी
माझा एक काल्पनिक मित्र आहे. कॉलेजमध्ये सर्व जण करतात तसे त्यानंही बरेच उद्योग केले. पोरींना भरपूर त्रास दिला. सरांची नक्कल केली. कॅंटीनचे पैसे बुडवले. "फर्स्ट डे फर्स्ट शो" पाहिले. दर महिन्याला त्याच्या अंगावर नवा
शर्ट असायचा. तो नेहमी म्हणायचा. "जन्माला आलोय तर फुल्ल ऐष करणार, प्रेमाबिमात नाही पडणार" त्यानं त्याच्या बाईकरवही "आय हेट गर्ल्स" असंच लिहिलं होतं. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यामुळं लाडातच मोठा झालेला. शिवाय त्याच्या सोसायटीत भरपूर मुली. त्यामुळे मुलींचं त्याला तसं काही सोयरसुतक नव्हतंच. पोरींशी बिनधास्त बोलायचा. अभ्यासात हुशार नव्हता; पण खेळाची कमालीची आवड होती त्याला. कायम खिदळत असायचा. पण..

पण आज त्याच्या चेहऱ्यावरचं हसू
कुठल्या कुठं पळून गेलंय. तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. गोरीपान आणि देखणी मुलगी होती ती. कसलाही
विचार न करता त्यानं तिला बिनधास्त प्रपोज केलं होतं. ती होस्टेलला राहायला होती. सहा महिने तो तिच्या मागं लागला होता.

खरं प्रेम केलं होतं त्यानं. त्यामुळं त्या मुलीनंही होकार दिला. त्याचा स्वभाव निर्मळ होता. पण तो आई-बाबांना खूप घाबरायचा. लाडात वाढला असला तरी त्याच्यावर आई-बाबांचा धाक होता. त्यामुळं त्यानं प्रेमाविषयी
त्यांना काही सांगितलं नव्हतं. त्याची हिंमतच होत नव्हती.

तो तिच्यासोबत नेहमी खडकवासल्याला फिरायला जायचा. खडकवासल्याच्या पुढे पानशेत रस्त्याशेजारी एका ठिकाणी ते गप्पा मारत बसायचे. एकदा ते असेच फिरायला निघाले तेव्हा त्याच्या प्रेयसीनं एका कॅरीबॅगमध्ये छोटंसं रोपटं घेतलं होतं. आपण बसतो ना, तिथं मी हे रोप लावणार, अशी तिची कल्पना ऐकून तो पोट धरून हसला होता. त्याच्या हसण्यानं ती रुसूनही बसली होती. कसंबसं तिचा रुसवा घालवत दोघं त्या ठिकाणी गेले. दोघांनी तिथं रोपटं लावलं. सोबत पाण्याची बाटली होती. त्या रोपट्याला पाणीही घातलं. आठवड्यात एकदा तरी त्यांची तिथं
चक्कर व्हायचीच. दर वेळी ते दोघं त्या रोपट्याशेजारी गप्पा मारत बसायचे. एके दिवशी ती गावी निघाली. तो आईसोबत मावशीकडे गेला होता. त्यामुळं त्या दोघांना भेटता आलं नाही. शिवाय ती दोन दिवसांनी परत येणार होतीच. त्यामुळं नको येऊ भेटायला, असं तिनंच सांगितलं होतं. घरी पोचल्यावर फोन कर असं सांगून त्यानं फोन
ठेवला. तिचा फोन आला नाही, म्हणून त्यानं फोन केला; पण कुणीच उचलला नाही. घरी गेल्यानं मला विसरली वाटतं, असा राग मनात धरून त्यानंही परत तिला फोन केला नाही. दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी मला समजलं, तिचा अपघातात मृत्यू झाल्याचं. त्याला ही बातमी कशी सांगायची तेच सुचत नव्हतं. खूप धाडस करून मी त्याला सांगितलं. हळव्या मनाचा होता तो. जागेवरच खाली बसला अन्‌ मोठमोठ्यानं रडायला लागला. आवरणार तरी कसं त्याला? माझ्या गळ्यात पडून रडू लागला. क्षणाचाही विचार न करता त्यानं गाडी काढली. मला पाठीमागं बसवलं अन्‌ आम्ही तिच्या गावाकडं गेलो; पण काही उपयोग नाही. सर्व काही उरकलेलं होतं. तिथं त्यानं स्वत:ला
सावरलं. तो तिथं रडला असता, तर तिथल्या लोकांना संशय आला असता. आम्ही तिच्या बाबांना भेटलो अन्‌
अर्ध्या तासात माघारी फिरलो..

मला वाटलं, आम्ही घरी येतोय. पण आमची गाडी खडकवासल्याकडं निघाली होती. मी काही बोललो नाही. पानशेत रस्त्याशेजारी त्यानं गाडी थांबवली अन्‌ एका झाडाला पकडून तो मोठ्यानं रडू लागला. त्यानंतर दररोज तो तिथं जात होता अन्‌ झाडापाशी बसून मुसूमुसू रडत होता. आठ महिन्यांपूर्वी त्याच्यावर
दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण आता तो हळूहळू सावरतोय. आता त्याचा स्वभावही बदलला आहे. एखाद्या
शांत मुलाप्रमाणं तो वागतोय. त्याच्या आई-बाबांना याविषयी काहीच माहिती नाही. तो घरात काही बोलतही नाही. फक्त रात्रीच्या वेळी तिनं त्याला दिलेली लेटर वाचतो. तिनं दिलेलं गुलाबाचं फूल आता सुकलंय. ते एकटक बघतो
अन्‌ उशीत तोंड खुपसून रडतो. तो म्हणतो, ""ते झाडच आता माझं सर्वस्व आहे. त्या झाडाच्या पानाफुलांत मी तिला शोधतो. लोक झाडावर प्रेम करा असं म्हणतात;पण मी प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सांगीन, की तुम्हीही असं एखादं रोपटं लावा. तुमची "लव्ह स्टोरी" माझ्यासारखी अर्धवट राहणार नाही.
खरं प्रेम असेल, तर ही निःस्वार्थी रोपं खूप काही देतात. मी स्वत: हे अनुभवतोय.'

मी आणि माझी अश्विनी

मी आणि माझी अश्विनी.
भूतकाळ-
2009:- ......प्रेम म्हणजे, फक्त एक दिवस भेटायला यायचो आणि पुण्याहून नाशिकला जाताना एकमेकांचा निरोप घेताना हातात घेतलेला हात आणि खारट आश्रू पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा. ♥
2010 :- प्रेम म्हणजे, तिला कंपनी मधून यायला उशीर झाला म्हणून, मला स्वयंपाक येत नसताना सुद्धा तयार केलेला कच्चा भात आणि आळणी वरण, आनंदाने खाल्ले . ♥
वर्तमान काल
2011 :- प्रेम म्हणजे, आज ती माझ्यापासून दूर आहे, प्रत्येक क्षणी भेटावे असे वाटते, पण फक्त तिचा आवाज ऐकून मन घटत करतो, राहवत नाही पण, पर्याय पण नाही. ♥
भविष्यकाळ
2020:- प्रेम म्हणजे, ती दमले आहे हे बघून स्वतः आवरलेले घर आणि प्रयत्न करून चांगला बनवलेला स्वयंपाक.
2030 :- प्रेम म्हणजे, मी आजारी असून, बरेच दिवस बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी तिने केलेला विनोद. ♥
2040:- प्रेम म्हणजे, माझा शेवटचा श्वास घेताना पुढल्या जन्मात लवकरच भेटण्याचे दिलेले वचन

Tuesday, June 28, 2011

Late to Office, Be punctual


Punctuality is the characteristic of being able to complete a required task or fulfill duty before or at a previously-designated time।

Punctuality means to the company money well spent. The company is paying their employees to start work at specific time, whatever the start time is with each company - and they expect their employees to show up at the scheduled time without missing a minute.

If an employee is not punctual, the manager automatically will think that this employee is not reliable. If there is a project with a deadline, the manager will look for someone who is punctual to finish that project. He is not going to risk giving it to the person who is not punctual.

When you are punctual in the workplace, lets everyone that you are reliable. One can depend on you either rain, sleet or snow that you will show up. One can rely on you to finish all the projects that are assigned. Therefore, one gains the respect of manager, colleagues and of the company, overall, it pays to be punctual and it gains respect in the workplace.

Not many people are always on time at work. On average, business people are running behind their schedules for 5-10 minutes, but still they are considered to be quite punctual. Being always late or unable to complete your tasks on time creates a lot of pressure and causes a great number of tensions at work.
Therefore, below are the easy recommendations for those who want to change their style and be more punctual.

1. Try to find out what exactly causes your delay. Why do you leave your house late every time? Why are you always late with your projects and tasks? Maybe, those are unnecessary drives and urges you can’t resist? Or can it be your habit to stay in bed till the last moment? Monitor your daily activities closely and try to spot 2-4 things that cause you running behind the schedule.

2. Change your approach. Accept your tardiness as a bad habit that you need to get rid of and get ready for make the changes in your behavior. Understand the reasons and get motivated for a hard work on self-disciplining. Start thinking in a rational manner and avoid impulsive actions.

3. Think about the risks connected with your being late and delay. Understand that the consequences of your tardiness can be really negative and unacceptable. Your status in the eyes of your colleagues and bosses will not be high, and this can seriously lower your chances of promotion. Also, the tasks and projects you are involved in will be associated with stresses and late delivery. What to say about possible disciplinary actions and low self-esteem.

4. Learn to plan and prioritize your activities. Also, you should learn to understand, what must be done right away, what is important and has to be done soon, and what should not be done at all. Plan and schedule your tasks and actions even if your day is not too busy. This way you’ll turn planning and scheduling into a habit.

5. Think about the responsibility. Being punctual is closely linked to admiration to the time and efforts of other people, to being more responsible and successful, to self-development and personal development day by day. Remember that punctuality will bring you excellent return, today and tomorrow.

Tuesday, May 10, 2011

वेळ काढून जरूर वाचा.........

(हा मेल मला फॉरवर्ड केलेला मिळाला, वाटले आपना सर्वान सोबत शेयर करावाखुपच छान आहे, जरूर वाचा.)

हॅलो सर, मी बर्लिनहून बोलतोय! सर मी २८ वर्षांचा आहे आणि माझे आई-वडील ठाण्यात असतात. बाबा म्हणतायेत तू शिक अजून. ते कर्ज काढतायेत, पण मला वाटतंय आता बस्स! मी पीएच.डी. झालोय..नावसुद्धा सांगता हा मुलगा ऊर फोडून बोलत होता. माझ्या तोंडून फक्त.. हं.. हं..! मी परत ठाण्याला चाललोय, बाबांना सांगणार आहे, तुम्ही रिटायर व्हा! माझे बाबा खरंच दमलेत हो.. गेले काही दिवस मी खूप दिवस अस्वस्थ होतो, पण काय करावं सुचत नव्हतं. इंटरनेटवरदमलेला बाबागाणं ऐकलं आणि परतीचं तिकीट काढलं.आता माझ्या तोंडून हं.. हंसुद्धा जात नव्हतं, इतका सुन्न झालो मी. एक उच्चशिक्षित तरुण इतका हळवा होऊन छोटय़ा मुलासारखा रडत होता.. बाऽऽऽऽप रे! हे काय आहे? दाद ? चांगल्या गाण्याला प्रतिसाद़़? की रसिकता़़़, हळवेपणा, खरेपणा.. खूप विचार केला आणि उत्तर सापडलं ते एवढंच, की याला म्हणतात नातं.

दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई..
नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही..

हे आमचं गाणं ऐकून एक भगिनी रंगात येऊन रसग्रहण करीत होत्या- आजचे आई-बाबा स्वत:मध्येच इतके व्यस्त असतात की, मुलांसाठी वेळ आहे कोणाला? आजची मुलं फार एकटी झाली आहेत. त्यांची व्यथा.. वगैरे वगैरे.. त्या कौतुक करत होत्या. पण ते ऐकताना डोक्यात इतका कल्लोळ झाला की, वाटलं, आम्ही नाही हो इतके वाईट, नाही हो इतके स्वार्थी.. हतबल आहोत आम्ही! ..डोळ्यासमोरून एखादा चित्रपट जावा तसे मी पाहिलेले सगळे व्यग्र बाबासरकत होते..
खूप आधी ठरवूनसुद्धा आयत्या वेळेला बॉसनी महत्त्वाचं काम लावलं, म्हणून मुलाच्या गॅदरिंगला जाऊ न शकलेला बाबा..’, त्याच गॅदरिंगमधलं मुलाचं गाणं फोनवरून ऐकून गाडीत एकटाच टाळ्या वाजविणारा बाबा’, परदेशातून येताना मुलीने फर्माईश केलेली बार्बी डॉल घेऊन वाढदिवसाच्या दिवशी पोहोचण्याचा आटापिटा करताना विमान रद्द झाले, म्हणून रात्री उशिरा पोहोचल्यावर मुलीच्या उशाशी बाहुली ठेवून झोपलेल्या त्या मुलीकडे पाहत आपले अश्रू इतरांपासून लपवणारा बाबा..’, नाटकाच्या दौऱ्यावर असताना दर चार तासांनी आपल्या बायकोला फोन करून सहा महिन्याच्या बाळाच्या कानाला फोन लावायला सांगून हॅलो हॅलो. मी बाऽबाम्हणत आपला सहवास देऊ पाहणारा अस्वस्थ बाबा’, घरापासून दूर सहा-सहा महिने बोटीवर, युद्धभूमीवर राहणारा आणि पत्रातून, फोनमधून माझी आठवण काढतात ना मुलं? मी आठवतो ना त्यांना? अशा प्रश्नांना बायकोच्याहो..या उत्तरासाठी आसुसलेला बाबा’.. इथपासून ते मुलीचं लग्न ठरल्यापासून रोज बोलता बोलता ठसका लागला म्हणून डोळ्यात पाणी आलं, बाकी काही नाही..असं म्हणणारा बाबा’!

बाळाकडे पाहून वेडा होऊन नाचणारा बाबा’, ऑफिसमध्ये अतिशय कडक असलेला, पण घरी शाळा-शाळा खेळताना मुलीच्या हातचा धपाटा आनंदाने खाणारा बाबा’, रात्री उशिरा घरी आल्यावर मुलांच्या केसातून हात फिरवत एकटाच बोलणाराबाबा’, मुलांबरोबर फटाके उडवताना पुन्हा एकदा लहान होणारा बाबा’, कामानिमित्त घरापासून दूर राहूनही दर रविवारी काही तासांसाठी धडपडत घरी येऊन मुलांना डोळे भरून बघणारा बाबा, शिकायला परदेशात गेलेल्या मुलीशी वेब-कॅमवर गप्पा मारताना तू बारीक का वाटतेस गं? तिकडे खूप त्रास होतोय का?’ म्हणतनाही तर सरळ परत ये भारतातअसं सुचवणारा बाबा..

या सगळ्या बाबांचीहाक’, त्यांची धडपड, करिअर, पैसा हे सारे सांभाळत मुलांबरोबर वेळ घालविण्यासाठी ते करीत असलेला आटापिटा- हे सगळं सांगावसं वाटलं!

अशा प्रत्येक पुरुषाला ही बोच असते. जेव्हा मित्र एकत्र जमतात, तेव्हा एकमेकांना खूप मनापासून सांगतात की, ‘थोडा आराम कर, मुलांबरोबर मजा करकळतं, पण साधायचं कधी? कसं? ते कळत नाही. या गर्दीत धावताना आपलं जगणं कुठे आपल्या हातात राह्यलंय?

माझा मुलगा मला जसं म्हणाला की, खूप गमती आहेत माझ्याकडे, आता नको पैसे, तू घरी थांब.’ ..कुठे थांबायचं हे मुलं सुचवतात, पण आपल्यालाच समजत नाही. धावत राहतो आपण. आणि मनात ही भीतीही बाळगतो की, उद्या मुलं मोठी झाल्यावर गरज असेल त्यांना आपली?
अस्वस्थ मनानं हे सगळं संदीप खरेशी बोललो. त्याचं आणि माझं नातं म्हणजे -

न सांगता तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बंध
कळ्यांचा चाले कळ्यांशी संवाद.

असं आहे. त्यालाही हे सारे असंच, इतकंच तीव्रतेने वाटत होतं आणि त्याच्यातला हळव्या मनापासून कविता लिहिली. माझ्या अस्वस्थ अवस्थेतच चाल तयार झाली होती. दु:खापेक्षाही उद्विग्नता, फ्रस्ट्रेशन मांडणारी ही चाल आणि ते शब्द यांतून हे गाणं रसिकांच्या मनात खूप खोलवर रूजलं.

प्रत्येक ठिकाणी वेगळे किस्से, वेगळ्या प्रतिक्रिया.. कार्यक्रमात छोटी-छोटी मुलं-मुली आपल्या बाबांना रडताना पाहून सुन्न झाली. कोणी माझ्या बाबाला का रडवलंसम्हणून आमच्यावर चिडली. सासरी गेलेल्या मुलींनी बाबा गाणं ऐकलंत?' म्हणत फोन केले. सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुटक्या, हळव्या आणि दुखऱ्या..

हे गाणं मुलांनी बाबांसाठी ऐकलं आणि बाबांनी मुलांसाठी, आणि बाबांच्या बाबांसाठीही. हे गाणं जितकं बाबाचं, तितकंच ते आजच्या नोकरी-व्यवसाय करणाऱ्या आईचंसुद्धा..
प्रत्येक ठिकाणी गाण्यावर वेगळे किस्से, वेगळी प्रतिक्रिया.. सगळ्या तितक्याच हळव्या, दुखऱ्या.. (इथे वाढू शकतं!!)

आम्हीही घरापासून दूर-दूर पुन: पुन्हा हे गाणं गातो आणि जखम रोज भळभळते. रोज ठरवितो की, या महिन्यात थोडं नीट नियोजन करायचं. मुलांबरोबर करायच्या अनेक गोष्टी घोळतात, पण बघता बघता हा महिना सरकतो.. मग स्वत:लाच पुढच्या महिन्याचं वचन.. हे चुकतंय, ते समजतं, पटतं. जे ठरवतो, ते हातून घडत नाही, यासारखी दुसरी बोच नाही. थोडं थांबायला हवंय. वेग कमी करायला हवाय..
पण निदान हे जमेपर्यंत तरी स्वत:ला टोचून टोचून रोज गायलाच हवं..

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो?
लवकर जातो आणि उशिरानं येतो..
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला..

डॉ. सलील कुलकर्णी

Monday, March 7, 2011

माणुसकीचा प्रत्यय

माझा एक छोटासा अनुभव: (आहे शुल्लक पण वाटले की सांगावे)

वेळ: ०१ मार्च २०११ संध्याकलचे ०५:५०ठिकाण: गोल्फ क्लब रोड, येरवडा

जे घडले माझ्याबरोबर ते कधी कधी आपण दुचाकी स्वारांच्या आयुष्यात तर घडतच असते... ते म्हणजे "गाडी पुम्चर होने। "

गाडी पुम्चर झाल्यावर आपण पुम्चर च्या दुकानात जातो, आणि आजकल चे हे दुकानदार बरोबर आपली गरज पाहून, एकच उत्तर देतात, "साब टुब बदलना पड़ेगा!" आपण कितीही गया वया केलि तरी, ते त्याच उत्तरावर अडून असतात, नाइलाजस्तव आपण ३० रुपयाच्या गोष्टी करीता २०० रुपये घालवून बसतोकाय करणार "अडला हरी , गाढवाचे पाय धरी".

पण माझा अनुभव थोडा वेगला आहेते म्हंझे असे झाले की माझी पण गाडी पुन्चर झाली होती, तब्बल होल्स आणि एक ठिकाणी टायर फाटला होतात्याने जेव्हा चेक केले तेव्हा तो सुधा हेच म्हणालापण मी त्याला म्हणालो, की आज माझ्याजवल फक्त १०० रुपये आहेत, तुम्ही जर हे एवढ्या पैशात करू शकत असाल तर ठीक आहे, नाही तर मी नेतो गाड़ी ढकलत।" तो म्हणाला, "साहेब, जर गाडी आशय अवस्थेत नेली तर, आपले आजुन जास्त नुकसान होईल।" "आपण रहायला, कोठे आहात?" मी उत्तरलो," निगडी" ....

त्याने एक मिनट विचार केला आणि म्हणाला, "काही हरकत नाही, मी तुमची गाडी रिपैर करून देतो, पैसे राहू द्यात। " मला माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही, जिथे शहरामध्ये प्रत्येक जन ग्राहकाला लुटायला बसलेला असतो, तिथे हा व्यक्ति मला अगदी देवासारखा वाटला, सर्व काम करायला त्याचा जवळ जवळ तास गेला, त्या नंतर म्हणाला " साहेब, आपल्या गाडीचा टायर ठीक झाला आहे, आपण जाऊ शकता" मी म्हणालो, "तुमचे पैसे मी उद्या नक्की देईन, तुम्ही केलेली मदत मी कधीच विसरणार नाही", तेव्हा तो म्हणाला," साहेब, हे सर्व जग विश्वासावर चालते, मला तुमच्यात भला मानुस दिसला म्हणून मी तुम्हाला मदत केलीपैसे तर मी रोजच कमवतो, म्हटले आज पुण्य कमवून बघुया... तुम्ही पैसे दया अगर नका देऊ, तो परमेश्वर वरून सर्व काही पाहत आहेकालजी घ्या आणि व्यवस्थित घरी पोहचा, आपली कोणी तरी वाट पाहत असेल "....

दुसरया दिवशी मी त्या सदग्रहस्ताला त्याच्या कष्टाचे पैसे देऊ केले... पण एक गोष्ट मी समजलो की, आपण समजतो तेवढे जग निष्ठुर नाहीये।

"विश्वासावर सर्व काही चालते, जिथे विश्वास संपतो तिथे सर्वच संपते..."

Friday, February 18, 2011

नांदा सौख्य भरे!!


आजच्या २१व्या शतकात स्त्री आणि पुरूष दोघे ही खांद्याला खांदा लावून प्रत्येक काम करतात. परंतु आज पण बहुतेक महिला वर्गाला खालील वाक्य एकदातरी त्यांच्या 'पतिदेवा' कडून आएकून घ्यावे लागते.

"तुला यातले काही समजत नाही, तू ह्या मधे तुझे डोके घालू नकोस, तू आपले किचन मधे बघ काय काम असेल तर.. यूस्लेस."

हे सर्व एकल्यावर त्या स्त्री ला किती दुख होत असेल, याचा कोणी सुध्द्धा विचार करत नाही. घरासाठी पती पैसे कमावत असतोच, हे त्याचे कर्तव्य आहे, पण वेळप्रसंगी स्वाताचे दागिने मोडून, नोकरी करून ती सुद्धा संसाराला हात भार लावतेच ना! मग तिने जर दोन चांगल्या गोड शब्दांची अपेक्षा केली तर कुठे बिघडले?

साधे उदाहरण, बर्याच वेळेला आपल्याला वास्तुशन्ति , वाड-दिवस अश्या कार्यक्रमांसाठी आमंत्रण मिळते. तिला खूप वाटते आपणा आपल्या 'पतिदेवा' बरोबर जोडीने जावे, पण हे महाशय कायमच म्हणणार,
"मला खूप काम आहे, तू जाणा मुलान बरोबर... एकटी गेली तर चालणार नाही का?"

म्हणजे तिला काय वाटते त्या आधीच आपला निर्णय सांगून मोकळे व्हायचे.

पण ... अश्या छोट्या गोष्टी घर म्हटले की होतच राहणार. स्त्री ही घरचा खूप मोठा आधार असते.. तिला सय्यम दाखवावच लागतो. आशावादी दृष्टिकोन ठेवावच लागतो. आपल्या संसारसाठी, मुलांसाठी मनाचे क्षितिजे रुंद करवेच लागतात.

आजची शिकलेली स्त्री, प्रत्युतर देऊ शकते. शब्द समर्त्यामुळे कदाचित, ती ह्या भांडणात जिंकू शकेल. पण त्यामुळे तिच्या गोजिर वाण्या संसाराला तडा जाउ शकतो. दुसर्याचा स्वभाव आपण बदलू शकत नाही ना! मग, आपण आपला बदलावा.. (जर आपले घर जपायचे असेल तर).

मला एकाच सांगू वाटते : कधी एकढ्या शांत वेळी आपल्या 'पतिदेवा' ना आपल्या मनातले सुप्त भाव प्रेमाने सांगून, त्यांचे मन जिंकावे.
"प्रेमाने बंध दृढ होतात, प्रत्युतरणे ते तूटतात."


नांदा सौख्य भरे!!

Saturday, January 29, 2011

ओर्कुट,फेसबुक - आभासी दुनिया


तरुण वयातील मुले मुली हि ओर्कुट,फेसबुक संकेतस्थळावर अक्षरशा पडीक असतात।यामागे नवीन गोष्टीचे आकर्षण,मनोरंजन अशा बाबी असल्या तरी त्याचा त्यांच्या मनावर आणि विचार करण्याच्या पद्धतीवर खोलवर परिणाम होत असतो.


या आभासी दुनियेत प्रत्येकजण आपली एक प्रतिमा तयार करायच्या मागे लागलेला असतो तो तसाच खरया जीवनात असेल असे सांगता येत नसले तरी काही कालावधी नंतर आपण त्या प्रतिमेप्रमाणेच आहोत असे त्याला वाटू लागते परंतु खरी परिस्थिती तशी नसते आणि ती समोर आली कि त्याला धक्का बसतो।
खरया आयुष्यात आपणाला जे काही बोलता येत नाही किंवा जसे वागता येत नाही परंतु तशी खूप इच्छा असते अशा गोष्टींची पूर्तता हि आभासी दुनिया करते।

आभासी जगात जगताना आपणाल जसे हवे आहे तसे जगता येते परंतु तसेच खऱ्या आयुष्यात जगता येत नाही आणि असे झाले कि मनाला खूप त्रास होतो आणि चीड चीड होते
त्यामुळे आपण जसे आहोत आपला स्वभाव जसा आहे तसा इथे मांडत राहावे त्यामुळे त्याचे काय परिणाम भावी आयुष्यात होऊ शकतात ते येथील चर्चेने आणि मैत्रीने समजू शकते

शेवटी कस जगायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे
फक्त एक आहे आपण इथे आभास निर्माण करून स्वताला फसवत असतो

या आभासी दुनयेचे व्यसन हो व्यसनच कधी लागते हे समजतच नाही आणि माणूस यात वाहून जातो वेळीच यावर उपाय नाही केला गेला तर आपल्या वैयक्तिक आयुष्याला यामुळे हानी पोहचू शकते.

Friday, January 14, 2011

अशीच एक सकाळ

एका स्त्री च्या दृष्टि कोनातून :


येतो असा एखादा क्षण जेव्हा तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजता, असं बऱ्याच वेळा होतं आपल्या बाबतीत।
सकाळ पासून मूड जरा खराबच असतो, सकाळचा पहीला चहाही नीट केल्या जात नाही, देवालाही कसाबसाच नमस्कार होतो। ऑफिस ला जायला पावलं घरातून बाहेर पडायला जड़ होतात. रस्त्याला लागल्यावरही आजुबाजुला फ़क्त बघ्यासारखं बघणं सुरु असतं. काम खुप असलं तरी करायची बिलकुल इच्छा होत नाही।
मग येतो एखादा ओळखी च्या व्यक्तीचा फोन आणि होतात गप्पा सुरु।

माझा आज मूड ठिक नाहीए गं.” नेहमीच्या स्वरात मी सुरु होते..
“का? काय झालं मूड ठीक नसायला?” तिकडचा आवाज म्हणतो..
मी सांगते मग माझी सगळी व्यथा. आज उठायला उशीर जाल्या पासून, रोजच्या कामापर्यंत मला आता कंटाळा आलाय इथपर्यंत.
आतापर्यंत शांत आणि आपलासा वाटणारा आवाज आता जरा बदलायला लागतो,। आणि सांगतो
“तुला नं पहिल्यापासूनच सवय आहे, सगळं चांगलं असतांना विनाकारण चिंता करायची। आपल्या आईला लग्नं झाल्यावर किती कामं करायला लागायची माहिती आहे नं तुला?” इथपासुन गावाकडच्या गृहिणींना रोजच किती मरावे लागते शेतात, वगैरे…मी आपली मान डोलावते।
त्यामानाने तुला तर काहीच त्रास नाही.” आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतॊ..
"अरे हो! खरंच आहे की. मी तर खुप मजेत आहे त्यामानाने."

कसं असतं नं ?

तुमच्या जवळ असलेल्या भाग्याची सतत कुणीतरी जाणीव करुन द्यायला लागते नाहीतर आपण असेच भरकटत राहतो…वाईट वाटुन घेत राहतो उगाचंच…

Thursday, January 13, 2011

जामनगर, गुजरात स्मशान भुमितिल पुतला

खली दिलेला फोटो सर्व कही बोलूं जातो माला जास्त कही सांगायची गरज नाही